दुबईत पाकिस्तानी तरुणांकडून भारतीय तरुणाचा छळ   

सिंधू जल करार स्थगित केल्याचा राग

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्यांदा सिंधू जल करार स्थगित केला. या रागातून दुबईमध्ये २६ वर्षांचा भारतीय तरुणाचा पाकिस्तानी तरुणांनी छळ केल्याचे समोर आले आहे.
 
विशाल असे  पाकिस्तानी तरुणांच्या द्वेषाला बळी ठरलेल्या तरूणाचे नाव आहे. तो उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातील किच्छा येथील रहिवासी आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला विशाल नोकरीसाठी ८ मे २०२५ रोजी दुबईला गेला होता. त्याला एजंट समीर अहमदने नोकरीचे आमिष दाखवून तिथे पाठवले होते. तिथे तो काही पाकिस्तानी तरुणांसोबत एका कंपनीत काम करायचा. पण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आणि भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने संतप्त झालेल्या या पाकिस्तानी तरुणांनी विशालवर आपला राग काढला आणि त्याचा मानसिक व शारिरीक छळ केला.
   
पाकिस्तानी तरुणांनी त्याला अनेक दिवस उपाशी ठेवले. विशालला मारहाण करत त्याचा पासपोर्टही त्यांनी हिसकावला होता. त्याने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्याच्या आईने ताबडतोब उधमसिंहनगरचे पोलिस अधिक्षक मणिकांत मिश्रा यांच्याकडे संपर्क साधला. विशालला दुबईमध्ये होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली.  मिश्रा यांनी ताबडतोब एजंट समीर अहमदला बोलावून त्याची चौकशी केली. पोलिशी खाक्या दाखवल्यानंतर त्याने विशालचा पासपोर्ट परत केला. मिश्रा यांच्या तत्परतेमुळे विशालची दुबईमधून सुटका करण्यात आली आहे.

Related Articles